Thursday, March 3, 2011

बुहुहुहू.....

काय झालेय, आताच एक पोस्ट टंकून झालीये आणि पुन्हा आपले रडगाणे सुरूच आहे (बुहुहुहू....)
ह्म्म्म, काय करायचे ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??.. ..??..
कविता करायची म्हणतंय मन, हे हे हे येड का खुंल, म्हणे कविता करायचीये, कळतं का कशाशी खातात तिला (हो आम्ही खाण्यासाठीच जगणारे प्राणीमात्र आहोत..एकदम कबूल) हे हे हि हि हि हा हा खु खु खा खा खे खे खे
ओके कंट्रोल कंट्रोल बच्चा.. हा तर काय कविता... काय आठवतंय बघूया यावरून...
१) ह्या नावाची ना माझी एक मामे बहिण होती, ((म्हणजे आहे अजूनही तिचे लग्न झाले मागल्या वर्षी (??? मेमोरी प्रोब्लेम), हि बाय मला कायम आठवते ते तिच्या बॉब कट साठी (केसांचा), म्हणजे ना हिचे केस हे एक प्रकरणच होत, सतत पिंजारलेले, त्यावत एक प्लास्टिक चा बेल्ट (बहुदा लाल रंगाचा) शाळेत लावतात तसा, त्यातून सगळ्या केसांचे मिळून त्या बेल्ट भोवती चिमणीचे घरटे झालेले, तोंडावर लहानपणी काळे डाग (बहुदा चिकट) आणि मोठेपण मुरुमाचे डाग पडलेले, सतत चिवचिवणारी पोरगी, भारी कामसू, मोठ्याने बोलणारी (म्हणजे अगदी मोठ्याने घराच्या बाहेर ओसरी पर्यंत तिचा माजघरातला आवाज जायचा) अशी हि माझी बहिण)) हा तर काय झाल होत?? अरे हो , हिचे लग्न झाले मागल्या वर्षी आणि हि आलीये आता नागपूरला राहायला (सासरी), मस्त एन्जोय करतेय आयुष्य, ना नोकरीची वणवण ना पैश्याची चणचण, ना सासूची घनघन (मुठीत ठेवली सासूला पठ्ठीने).. घरात काम करायची, नवऱ्याची सेवा (हो बरोबर वाचताय) करायची, सासूला गोड शब्दात गुंडून ठेवायचे आणि ... आणि काय मज्जा कि ....(मला जमेल का हे असा सगळ??? श्या काय पण विचार करतीये मी...)
२) कविता... कुसुमाग्रज. आताच यांचा वाढदिवस 'मराठी दिवस' म्हणून साजरा झालाय, आता ते मराठीतले मोट्ठे कवी होते, निःसंशय अत्यंत प्रतिभाशाली होते, पण म्हणून त्यांचा वाढदिवस एक दिन म्हणून का साजरा करायचा?? कायहेतू असू शकतो?? कालनिर्णयाच्या त्या पानावर अजून एक नोंद वाढेल, त्यांच्या नावाने जाहीर कार्यक्रम होवून आमच्याच पैशाने काही साहित्यिक काही नेते मिरवून घेतील, काही स्मृतिपर पुस्तके निघतील, काही नवीन कवींना संधी मिळेल, काही शाळांमध्ये खरोखर कुसुमाग्रजांना आदरांजली चे दर्जेदार कायक्रम होतील, बहुतेक त्यातून छोटे-कोवळे-मऊ-हिरवे कवितेचे बीजान्कुरही सापडतील आणि... आणि काय होईल?? (माझी धाव संपली इथेच...बहुतेक मिळाले उत्तर पण तरीही 'दिन' असलाच पाहिजे का???.... याला म्हणतात 'गाढवापुढे वाचली गीता....')
३) मी ना लहानपणी आईवर एक कविता केली होती, एकदम ओरीजनल ना, अन का कुणास ठावूक ती आईला नाही दाखवता आलेली मला, ती वही पण हरवली नंतर. पण तो फील.. आई वर कविता, तिची रोजची कामं, धावपळ, तिचे आमची काळजी घेणे, सुखावणारे क्षण, सारे सारे होते त्याच्यात. श्या... दाखवायला हवी होती तेव्हा आईला कविता ती, काय जरा हसलीच असती ना..!!! काही ना केलेल्या गोष्टींची अशीच चुटपूट लागून राहणारेय आयुष्यभर....
४) आम्ही कॉलेज च्या मासिकासाठी एका वर्षी कविता दिल्या होत्या, कोणी तर मी, माझी सिंधी आणि पंजाबी रूम पार्टनर, आणि वरून सांगतोय कि हि कविता आम्हीच लिहिलीये स्वतः म्हणजे तिघींनी मिळून. काय पण भारी ना ... आता त्या दोघीना मराठीचा गंध नाही आणि म्हणे कविता लिहिली.. (हे हे हे ) खरे म्हणजे आम्ही एका दुसर्या कॉलेजचे मासिक आणून त्यातून ६-७ कवितांचे तुकडे अगदी बेमालून जोडले होते... आणि ती कविता चक्क "उत्तेजनार्थ" चे लेबल लावून मासिकात छापून आणली होती, आता बोला... अहो होता वट आमचा तेव्हा कॉलेज मध्ये..!! आजही ते मासिक मी जपून ठेवलंय. आता त्या मैत्रिणी नाहीत, तो जिव्हाळा नाही, ती मैत्री पण नाही, पण त्या आठवणी मात्र नेहमी साठी आहेत...
५) वर्ग : ५वी अ, वर्गशिक्षिका : भोयर बाई. दिवस : बुधवार. विषय : मराठी. तास : दुसरा. गृहपाठाच्या वहीत लिहिलेला निबंध. अख्या वर्गात उत्तम निबंधासाठी नावाजलेली एक मुलगी वि. वा. शिरवाडकर यांच्यावर लिहिलेला निबंध वाचून दाखवतेय. अत्यंत रसभरीत वाणीने, उत्तम उच्चाराने आणि योग्य माहितीने बाईंचे मन जिंकून घेतेय.... आणि.... आणि ... तिच्या बेंच वरील तिच्या मैत्रिणी कसोशीने आपले हसू दाबून बसल्या आहे...
काय काय विचार आलेत तुमच्या मनात??? मी सांगू लगेच मनात अटकळ बांधली असेल कि ही मुलगी कुणा दुसरीने लिहिलेला निबंध वाचून दाखवतेय, भारी जोक क्र्यक झालाय, बाहेर मैदानावर कुणीतरी धडपडलाय किंवा असेच काही तरी ...हो ना. खरे म्हणजे, ती मुलगी जी वाचत होती ना, तिने चक्क कोरी वही समोर पकडली होती, आणि आपल्याच मनाने बडबडत होती (काय जबरदस्त वाचन असेल नाही) .. आता बोला. हाय का नाय गंमत... आता विचार ती मुलगी कोण होती??? नाही नाही मी नाही काय राव... काहीही काय.
ती होती..............च्च विसरले नाव, पण ना वर्गात सगळ्या शेवटल्या बेंचवर बसायची.. (तिच्याशी मैत्री करायचीच राहिली, पाचवीत असताना शाळा सोडून निघून गेली, पुढे काहीच कधीच कळले नाही तिचे).
६) उन्हाळ्याची दुपार, दाट पिंपळाखाली गार सावलीत विसावलेल्या दोघी, सोबत एक वाटरबॉटल, पांढरा कांदा, मसाला फुटाने, कच्चे धापोडे, गुळ-शेंगदाने, आणि असे बरेच काही सटर -फटर, समोर वाहणारी कोरम्बीची नदी, अतीव शांतता आणि दोघींच्या रंगलेल्या गप्पा... हसणे- खिदळणे, यव नी त्यंव,
मी आणि माझी मैत्रीण शिल्पा, बर्याच उन्हाळी दुपार आम्ही अश्या घालवल्या आहेत.... अगदी कवितेच्या धुंदी सारख्या...
७) अजून काय काय आठवतंय, पण सगळ्या आठवणी बालपणीच्याच आहेत, अगदी ५ वी ते १० वी पर्यंतच्याच... कसला मस्त होता तो काळ, कवितेसारखा, लगेच न कळणारा प्रकार, पण एकदा अर्थ समजायला लागला कि अगदी बांधून ठेवणारा पाश जणू....

No comments:

Post a Comment